Skip to main content

रेशीमगाठी… भाग २

निकिता एक सर्व सामान्य घरातली मुलगी. घरात एकूण चार जण.. आई, वडील, छोटा भाऊ आणि निकिता. हे रेशीमगाठी प्रकरण चालु झाल्यापासून ती सतत विचार करायला लागली होती. आजही आई च्या सांगण्यावरून तिने साईट चालू केली आणि मुलांची माहिती डायरी मध्ये नोंद करू लागली. त्यातही आईच चालूच होत ...या मुलाचं आडनाव आपल्या नाते संबंधांमध्ये बसत नाही, या मुलाचं गाव खूपच लांब आहे. 3-4 मुलांचे फोन नंबर तिने आईच्या हातात दिले आणि ती बाजूला झाली आणि शेजारच्या छोट्या निनाद सोबत ती खेळू लागली. आई मात्र त्या नंबर वर कॉल करायचा प्रयत्न करत होती. तिने पहिला नंबर लावला,
आई,” हॅलो, मी सुमन पवार बोलते, तुमचा नंबर मला रेशीमगाठी च्या साईट वरून मिळाला. तुमची थोडी माहिती हवी होती…”
समोरची व्यक्ती ,” आमच्या मुलाचं लग्न झालं “
आई गडबडली, “ बर बर , ठीक आहे” बोलून तिने फोन ठेवला.
काही कळतं कि नाही...या लोकांना, लग्न झालं तर त्याच नाव काढून टाकायचं ना रेशीमगाठी मधून...असं पुट-पुटत तिने दुसरा नंबर लावला.
आई, “ हॅलो, मी सुमन पवार बोलतेय.. तुमचा नंबर मला रेशीमगाठी च्या साईट वरून मिळाला.”
समोरची व्यक्ती, “ हो. मी मुलाची आई बोलतेय.”
आई, “ आम्ही तशी पाहिली तुमची माहिती रेशीमगाठी वरून. आम्ही कुंडली पण पाहिली ऑनलाईन, २२ गुण जुळत आहेत. तुम्ही माझ्या मुलीचा रेशीमगाठी चा नंबर लिहून घ्या आणि नंतर काय ते सांगा फोन करून.”
नंबर घेऊन ठीक आहे बोलून समोरच्या व्यक्तीने फोन ठेवला.
असाच तिसऱ्या नंबर वर पण कॉल करून तिने , काय ते सांगा फोन करुन… असं बोलून महत्वाचं काम संपवलं.
दुसऱ्याच दिवशी दोन्ही मुलांच्या घरून फोन आला. आई ने रात्रीे जेवत असतानाच विषय काढला...वडिलांकडे बघत ती बोलू लागली, मी काल फोन केलेला ना त्या दोन मुलांच्या घरून फोन आलेला ते कधी येऊ विचारत होते. हे ऐकूनच निकिताच्या पोटात गोळा आला. वडिलांनी सांगितलं, एकाला शनिवारी संध्याकाळी आणि एकाला रविवारी संध्याकाळी बोलावूया. निकिता मात्र गपचूप जेवत होती. जेवण आटोपून लगेच तिने तिच्या मैत्रीनीला सोनलला मेसेज केला.
सोनल, “ काय यार, निकिता आपलं ठरलेलं ना या रविवारी आपण भेटायचं.”
निकिता, “ अग हो, पण तूच सांग...मी तरी काय करू, मलापण भेटायचं होत, एकतर नोकरीला लागल्यापासून आपल्याला भेटायला पण नाही जमत, पण आता जर मी काही बोलली तरी घरातले माझं ऐकणार नाहीत. जाऊदे पुढच्या रविवारी आपण नक्की भेटू.”
सोनल, “ बरं, चल मी जाते जेवायला” अस बोलून त्यांच्या गप्पा संपल्या.
मुळात मुलगी बघणे हा प्रकारच तिला आवडत नव्हता. एकतर त्या मुलीला छान तयार करून शोपिस सारखं सगळ्यांसमोर बसवणं आणि मग तिला वाट्टेल ते प्रश्न विचारण. त्यातही तिने जास्त बोलल तरी प्रॉब्लेम आणि जास्त बोललं नाही तरी प्रॉब्लेम. काही जण तर डायरेक्ट परीक्षेला बसल्यासारखे प्रश्न विचारतात. तिला काही दिवसांपूर्वी तिच्या ऑफिस मधल्या एका मैत्रिणीने सांगितलेला एक किस्सा आठवला, तिला एकदा एका मुलाने पेपर वाचते का रोज असं विचारलं, तिने हो सांगितलं आणि त्याने डायरेक्ट दुसऱ्या पानावरील पहिली बातमी कोणती हे सांग… असं विचारलं. त्यावेळी आपण किती हसलो पण खरंच असं मला कोणी विचारलं तर काय सांगू ? काही मुलं तर पॉलिटिक्स, मंत्रिमंडळ आणि कोणती खाती कोण सांभाळत हे विचारत बसतात… पण अजूनही कळत नाही की या सगळ्या गोष्टींचा लग्नाशी काय संबंध असतो आणि आता हीच परिस्थिती आपल्यावर येणार आहे. उद्या आपल्याला बघायला कोणीतरी येणार… हा विचार करत सारखी कुशी बदलून झोपायचा प्रयत्न निकिता करत होती. तिच्या शेजारीच झोपलेल्या आईने विचारलं, काय झालं निकिता ?
निकिता, “ काही नाही झोप येत नाहीये.”
आई, “ का ? कसला विचार करत आहेस ?”
निकिता, “काही नाही ग…”
निकीताच्या डोक्यावरून हळूच हात फिरवत आई बोलली, “ आई आहे ग मी तुझी, माहितीये मला… तु उद्याचा विचार करत आहेस, पण काळजी नको करुस एवढी. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येतो, आणि आम्ही सगळे असणारच आहोत तुझ्यासोबत आणि तुला योग्य वाटल तरच आपण पुढे बोलणी करायची. त्यामुळे एवढं टेन्शन नको घेऊ आणि झोप शांतपणे. कामावर पण जायचंय उद्या.”
आणि आई च्या कुशीत शिरून निकिता शांतपणे झोपली.
आईने सकाळीच सांगितलेलं, ते लोक 7 वाजेपर्यंत येतील. तु  लवकर ये, लेट आलीस तर उगाच गडबड होईल. त्या दिवशी तिच्या हृदयाची गती फास्ट ट्रेन च्या पेक्षा जास्त असल्यासारखं तिला जाणवत होतं...

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मी जिजाऊ बोलतेय

पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारा- दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली.आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजेच जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच,सल्लामसलत, रयतेची गाऱ्हाणी...न्यायनिवाडे तर नित्याचेच हे असं होत आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबर 700 च्या वर आम्ही मुलींची 1 फौज तयार केली होती. पहाटे- पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या, काही म्हणायच्या .. या पोरींचं कस होईल पण आम्ही निश्चय केलेला, स्वतः सोबत ...इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो,...मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण- महाभारताबरोबरच, नामदेवांची गाथा, कबिराचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला,...धर्म म्हणजे काय?..धर्म म्हणजे मानव सकल कल्याण कि कर्म कांड?, आम्ही तलवार चालवतो कुणासाठी?, प

डॉक्टर !!!

तो : काय रे डॉक्टर कधी येणार ? कंपाऊंडर : डॉक्टर साहेब काय आता येत नाहीत. तो : का रे ? वेळेत तर आलोय...माझ्या मुलीला फार ताप आलाय...नेहमी आम्ही याच डॉक्टरांकडे येतो... प्लीज त्यांना लवकरात लवकर कॉल करून बोलावून घे. कंपाऊंडर : अहो साहेब, नाई येणार ते… तो : असे कसे नाई येणार, तुला माहित नाही का मी कोण आहे ते… आत्ताच्या आत्ता फोन लावून बोलावून घे नाहीतर पार्टीतल्या लोकांना बोलावून तुझ्या त्या डॉक्टर च लायसेन्स रद्द करायला लावेन. जनतेची सेवा करायची करायची सोडून घरी आराम करत बसलाय काय? कंपाऊंडर : रागावू नका हो साहेब. मी ओळखलं तुम्हाला. पण परवाच एका विरोधी पक्षाच्या नेत्याचे वडील  अटॅक  येऊन गेले तर, कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली...लाथा- बुक्क्यांनी तुडवल आणि वर एकाने जाताना चाकू पण खुपसून गेला. आजच डॉक्टरांचं निधन झालं. बिचारे जाता - जाता पण….का डॉक्टर झालो म्हणत होते !!!

" सॉरी (Sorry)" ... Just a word

आज १ दिवस झाला तरी दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. ३ वर्षांनी घरात पाळणा हलला होता. दोघेही बाळावर प्रेम खूप करायचे पण तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. एकाबाजूला त्याच्या कामाचा व्याप वाढलेला, जबाबदारी वाढलेली, तर दुसऱ्या बाजूला तिची बाळामुळे मानसिक आणि शारीरिक दमछाक होत होती. कुठला राग कुठे निघत होता, काहीच कळत नव्हतं. आधी कधीच अस झाल नव्हतं.  मुलासामोर मात्र ते दोघे नॉर्मल च होते. या वेळी दोघांनीही ठरवलेलं मी नाही सॉरी बोलणार, नेहमी मीच का सॉरी बोलु ? त्यांच्या २ वर्षाच्या बाळाला मात्र काहीच कळत नव्हत.  बाळ निरागस पणे खेळण्यात बिझी होतं. बाबा कामावरून आला. ती पाण्याने भरलेला ग्लास आणून समोर ठेवते आणि किचन मध्ये निघून जाते. तो थोडंसं पाणी पितो आणि ग्लास टेबलवर ठेवून फ्रेश व्हायला निघून जातो. ५ मिनिटांनी जोरात आवाज होतो म्हणून दोघेही बाहेर धावत येतात आणि पाहतात तर, त्यांचा मुलगा तो ग्लास उचलून आत ठेवायला जात असताना पाय अडकुन पडतो आणि त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो. मुलगा घाबरून उठतो आणि कान पकडून ..." सॉली " बोलत आईला जाऊन मिठी मारतो आणि आई - बाबा