Skip to main content

रेशीमगाठी...भाग ८

निकीताने फेसबुक चालू केल आणि निखिलने पाठवलेली तिसरी फ्रेंड रिक्वेस्ट तिने डिलीट केली. तिने आज मनाशी निर्णय घेतला आणि निखीलशी जे काय आहे ते स्पष्टपणे बोलायचं ठरवलं त्याप्रमाणे तिने निखिलला भेटायला बोलावलं.
सकाळपासूनच त्याच्याशी काय बोलायचं ...त्याला काय विचारायचं हे तिने ठरवून ठेवलं होतं. निकिताला भेटायला जायचं म्हणून निखिल खुश होता पण निकिताने काही महत्वाचं बोलायचंय असं म्हटल्यावर मात्र निखिलच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्याच्या सोबत जे आधी झालं होतं त्यामधून तो कसातरी सावरला होता आणि आता पुन्हा निकिताने असं बोलावलं तेव्हा त्याला परत भीती वाटू लागली.
ते दोघेही कॉफी शॉपमधे भेटले. निखिल आधीपासूनच तिथे उभा राहून तिची वाट पहात होता. निकिता आली, थोडी गंभीर दिसत होती ती. निखिलने तिच्याकडे हसून पाहिलं मग तिनेही ओठ ताणून थोडस हसल्यासारखं केलं.
निखिलने घाबरत का होईना पण विषयाला हात घातला, “बोला… काय महत्वाचं बोलायचंय तुम्हाला ?”
निकिता, “मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होत..”
निखिल तिच्याकडे पहात, “विचारा”
निकिता, “म्हणजे….मला भीती वाटतेय”
निखिल दचकून एकडे तिकडे बघत, “ कोणाची ?”
निकिता, “तस नाही हो”
निखिलला काही कळतच नव्हतं. निकीताने मोठ्ठा श्वास घेतला. आणि बोलू लागली.
निकिता, “तुम्ही मला सांगितलंत कि तुमचं एका मुलीशी लग्न ठरलं होतं, तुम्ही तिला बऱ्याच वेळा भेटलात आणि फिरलात तिच्यासोबत. तुम्हाला ती फार आवडत होती…”
निखिलला आता अंदाज येऊ लागला होता तिच्या मनाचा. त्याने मानेने होकार दिला.
निकिता, “मी खरंच तुम्हाला आवडते ?, तुम्ही मला पहिल्याच दिवशी कसा होकार दिला...फक्त मी दिसायला आवडले म्हणून ? अजूनही तुम्ही त्या मुलीशी संपर्कात आहात का ?, आणि तिच्यावरच्या रागामुळे तर तुम्ही मला हो नाही ना म्हटलात?” निकिता ने प्रश्न थांबवले आणि त्याच्याकडे पाहू लागली.
तिचे प्रश्न संपताच त्याने तिला उत्तर द्यायला सुरुवात केली , “मी त्या मुलीशी त्याच दिवशी संबंध तोडला होता ज्या दिवशी ती मला नाही म्हटली. आता मला तीच तोंड बघायला देखील आवडणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बद्दल मी आधीच जमेल तेवढी माहिती काढली होती. तुमच्याशी बोलून मला तुमचा स्वभाव कळला आणि मला तुमचा रंग, तुमची उंची किंवा तुमचं शिक्षण याच्याशी फरक पडत नाही कारण मला हवी तशी जोडीदार भेटणं महत्वाचं आहे आणि ती जोडीदार मी तुमच्यात पाहिली. मला फरक पडत नव्हता माझ्या आई- वडिलांना काय वाटत कारण संसार मला करायचा होता आणि त्यासाठी माझ्या इच्छा, अपेक्षा महत्वाच्या होत्या आणि तुमच्या मन-मिळावू स्वभावामुळे माझ्या आई-वडिलांना हि तुम्ही आवडणार हे मला माहित होत म्हणून मी त्याचवेळेस तुम्हाला माझा होकार कळवला. ”
निखिल बोलत होता आणि निकिता शांतपणे त्याच सगळं ऐकत होती. त्याच बोलणं संपलं होत आणि ती तशीच त्याच्याकडे एकटक बघत होती हे तिच्या लक्षात आलं तस तिने आपली नजर खाली केली.
निखिल, “हे बघा, अजून तुम्हाला काहीही विचारायच असेल तर विचारा कारण जर काही प्रॉब्लेम असेल तर ते आत्ताच कळालं तर बर होईल.”
निकिता, “माफ करा जर तुम्हाला राग आला असेल तर…”
निखिल, “नाही. मला खूप बर वाटल निदान तुमच्या मनात जे प्रश्न होते माझ्याबद्दल ते तुम्ही मला विचारले. मला या नात्यात काहीही गैरसमज नको आहे. पण…. मला राग येतोय…”
निकिता घाबरून, “ का ?”
निखिल, “घाबरू नका, म्हणजे तुम्ही मला तु म्हटलेलं जास्त आवडेल.”
निकिता, “तुम्हीपण मला… सॉरी, तु पण मला अरे-तुरे केलेलं आवडेल.” आणि दोघांनीही एकमेकांकडे हसत पाहिलं.
निकिता ने घरी जाऊन आईला होकार कळवला आणि आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. संध्याकाळी बाबा घरी आले आणि आई त्यांना देशमुखांच्या घरी होकार कळवायला सांगत होती आणि बेडरूममध्ये बसून निकीता मात्र काहीतरी आठवून एकटीच हसत होती, सारखी स्वतःलाच आरशात पहात होती जणू स्वतामध्येच आज तिला काहीतरी वेगळं दिसत होतं. तिच्या आजूबाजूला रंगीबेरंगी फुलपाखरे उडत होती. आज पहिल्यांदा प्रेमात पडल्याचा आनंद ती अनुभवत होती. तिने फेकबुक चालू केलं आणि समोर निखिलची चौथी फ्रेंड रिक्वेस्ट तिने एक्सेप्ट केली आणि त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. सोनललाही तिने घडलेली सगळी हकीकत सांगितलं, सोनलला खूप आनंद झाला. दोघांच्याही घरातली मंडळी एकमेकांना भेटली. निकिता आणि निखिल दोघेही हुंडा किंवा काहीही देण्या-घेण्या च्या विरुद्ध होते हे त्या दोघांनी आपापल्या घरी आधीच सांगितलं होतं. तरीही म्हणतात ना घरातल्यांपेक्षा बाहेरचेच जास्त उतावीळ त्याप्रमाणे घरातल्यांनी नाही पण भावकीतल्या लोकांनी मात्र प्रश्न केलाच...देण्या-घेण्याचं काय ? पण निखिलच्या वडिलांनी मात्र परिस्थिती सांभाळून घेतली आणि निकीताचे बाबाही बोलले माझ्या मुलीला मी जमेल तेवढं आनंदाने देणार. निकिताचे आजोबा त्यांना विचारल्याशिवाय लग्न ठरवल्यामुळे रागावलेले आणि इकडेे निखिलच्या आईचाही या लग्नाला पूर्णपणे होकार नव्हता त्यामुळे तिचीहि थोडी कुरकुर चालूच होती. एक ना अनेक गोष्टी मधे मधे येत होत्या, आणि हे पाहता निखिलला तर, हे लग्न कधी होईल असं झालं होतं. बोलतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अगदी तशी अवस्था झाली होती.
पण बाप्पाने यांना भेटवण्याचा प्लॅन केलाच होता. देव जोड्या जुळवूनच पृथ्वीवर पाठवतो म्हणतात ना तेच खरं. एकदाची लग्नाची तारीख निघाली आणि दोघेही एकमेकांमध्ये गुंतून गेले. लगीनघाई मधे दोन्ही कुटुंब व्यस्त झाले होते. लग्नाची तारीख जवळ येत होती नवीन आयुष्य सुरु होणार याच्या आनंदाबरोबरच आपल घर आपल्याला सोडून जावं लागणार याची भीती निकिताला वाटत होती. कधीही घर सोडून न राहिलेली निकिता आता कायमची लग्न होऊन जाणार या जाणिवेने तिच्या आई-बाबांच्या डोळ्यात पाणी येत होत. इकडे मुलगा असला तरी, निखिलला टेन्शन आलेलं कि त्याच्यावर विश्वास ठेवून निकिता स्वतःच घर सोडून त्याच्यासोबत राहणार आणि त्याला तिला कोणत्याही बाबतीत निराश झालेलं पाहायचं नव्हतं.
पत्रिका छापल्या गेल्या. स्वतःचीच पत्रिका पाहुन निकिता गालातल्या गालात हसत होती. लग्नाची खरेदी आपापल्या पसंतीने झाली. सगळीकडे निखिल आणि निकिताच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. सगळेजण होणाऱ्या नवरा-नवरीला जेवायला घरी बोलवु लागले.
दारी तोरण लागले. हॉलमध्ये सनई-चौघडे वाजू लागले. देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी शपथ घेतली एकमेकांना साथ देण्याची. मंगलाष्टकांच्या नादात दोघांवर अक्षदा पडल्या आणि दोघांनी एकमेकांना हार घातला, निखिलने निकिताच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि हा लग्नसोहळा संपन्न झाला.
अशाप्रकारे, जुळून आल्या या रेशीमगाठी…
                                                                   #@ समाप्त @#

Comments

  1. Awesome. Happy Ending. Infact happy start of the married life.

    ReplyDelete
  2. Awesome. Happy Ending. Infact happy start of the married life.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मी जिजाऊ बोलतेय

पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारा- दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली.आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजेच जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच,सल्लामसलत, रयतेची गाऱ्हाणी...न्यायनिवाडे तर नित्याचेच हे असं होत आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबर 700 च्या वर आम्ही मुलींची 1 फौज तयार केली होती. पहाटे- पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या, काही म्हणायच्या .. या पोरींचं कस होईल पण आम्ही निश्चय केलेला, स्वतः सोबत ...इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो,...मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण- महाभारताबरोबरच, नामदेवांची गाथा, कबिराचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला,...धर्म म्हणजे काय?..धर्म म्हणजे मानव सकल कल्याण कि कर्म कांड?, आम्ही तलवार चालवतो कुणासाठी?, प

डॉक्टर !!!

तो : काय रे डॉक्टर कधी येणार ? कंपाऊंडर : डॉक्टर साहेब काय आता येत नाहीत. तो : का रे ? वेळेत तर आलोय...माझ्या मुलीला फार ताप आलाय...नेहमी आम्ही याच डॉक्टरांकडे येतो... प्लीज त्यांना लवकरात लवकर कॉल करून बोलावून घे. कंपाऊंडर : अहो साहेब, नाई येणार ते… तो : असे कसे नाई येणार, तुला माहित नाही का मी कोण आहे ते… आत्ताच्या आत्ता फोन लावून बोलावून घे नाहीतर पार्टीतल्या लोकांना बोलावून तुझ्या त्या डॉक्टर च लायसेन्स रद्द करायला लावेन. जनतेची सेवा करायची करायची सोडून घरी आराम करत बसलाय काय? कंपाऊंडर : रागावू नका हो साहेब. मी ओळखलं तुम्हाला. पण परवाच एका विरोधी पक्षाच्या नेत्याचे वडील  अटॅक  येऊन गेले तर, कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली...लाथा- बुक्क्यांनी तुडवल आणि वर एकाने जाताना चाकू पण खुपसून गेला. आजच डॉक्टरांचं निधन झालं. बिचारे जाता - जाता पण….का डॉक्टर झालो म्हणत होते !!!

" सॉरी (Sorry)" ... Just a word

आज १ दिवस झाला तरी दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. ३ वर्षांनी घरात पाळणा हलला होता. दोघेही बाळावर प्रेम खूप करायचे पण तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. एकाबाजूला त्याच्या कामाचा व्याप वाढलेला, जबाबदारी वाढलेली, तर दुसऱ्या बाजूला तिची बाळामुळे मानसिक आणि शारीरिक दमछाक होत होती. कुठला राग कुठे निघत होता, काहीच कळत नव्हतं. आधी कधीच अस झाल नव्हतं.  मुलासामोर मात्र ते दोघे नॉर्मल च होते. या वेळी दोघांनीही ठरवलेलं मी नाही सॉरी बोलणार, नेहमी मीच का सॉरी बोलु ? त्यांच्या २ वर्षाच्या बाळाला मात्र काहीच कळत नव्हत.  बाळ निरागस पणे खेळण्यात बिझी होतं. बाबा कामावरून आला. ती पाण्याने भरलेला ग्लास आणून समोर ठेवते आणि किचन मध्ये निघून जाते. तो थोडंसं पाणी पितो आणि ग्लास टेबलवर ठेवून फ्रेश व्हायला निघून जातो. ५ मिनिटांनी जोरात आवाज होतो म्हणून दोघेही बाहेर धावत येतात आणि पाहतात तर, त्यांचा मुलगा तो ग्लास उचलून आत ठेवायला जात असताना पाय अडकुन पडतो आणि त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो. मुलगा घाबरून उठतो आणि कान पकडून ..." सॉली " बोलत आईला जाऊन मिठी मारतो आणि आई - बाबा