शो भाला मात्र स्वतःचीच लाज वाटत होती. नक्की काय कमी पडली तिच्या प्रेमात की सुनिलने तिच्याशी असं वागावं. इकडे सुनिल मात्र दोन दिवसात घरी परतला. परशुरामचे डोळे शोभाला शोधत होते, पण सुनिल एकटाच होता. परशुराम उठून सुनिलला शोभाबद्दल विचारू लागला, “ सुनिल, शोभा कुठे आहे ?” सुनिल, “ती मुंबईत हरवली” परशुराम, “काय ? अशी- कशी हरवली? तु कुठे होतास ?” सुनिल , “मी तिच्या सोबतच होतो. तीच कुठे गेली काय माहीत, मला वाटतंय ती तिच्या यारसोबत पळून गेली.” परशुराम, “ तोंड सांभाळून बोल. शोभा तशी नाही.” सुनिल, “ मग कशी आहे ?, तुम्ही नका सांगू मला, वेडं बनवलं तिने आपल्या सगळ्यांना, सगळे दागिने आणि पैसे घेऊन पळून गेली ती.” सुनिल जोरजोरात रडून परशुरामच्या गळ्यात पडतो. सुनिल, “अहो बाबा तुम्ही खूप साधे आहेत त्याचाच फायदा उचलला तिने. बरं झाली ती अवदसा गेली.” परशुराम, “सुनिल, तोंड बंद कर तुझं” सुनिल, “ तुम्हाला स्वतःच्या मुलापेक्षा तिची जास्त काळजी आहे. मला एकदा तरी विचारलत मी कसा आहे?” परशुराम, “ मला विश्वास नाही बसते. शोभा असं नाही करू शकत." सुनिल, “असच झालय बाबा, विश्वास ठेवा माझ्यावर” परशुराम डोक्याला हात ल...