Skip to main content

Posts

घे भरारी...

वाईट विचारांना झुगारून, अंधश्रद्धेची मान मुरगळून, तोडून सगळे, मानवी पाश... विसरून सगळ्या, जगाची बंधने... पसरव तुझे पंख, हो मोकळी... स्वच्छंद अशा गगनात, घे भरारी....

" सॉरी (Sorry)" ... Just a word

आज १ दिवस झाला तरी दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. ३ वर्षांनी घरात पाळणा हलला होता. दोघेही बाळावर प्रेम खूप करायचे पण तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. एकाबाजूला त्याच्या कामाचा व्याप वाढलेला, जबाबदारी वाढलेली, तर दुसऱ्या बाजूला तिची बाळामुळे मानसिक आणि शारीरिक दमछाक होत होती. कुठला राग कुठे निघत होता, काहीच कळत नव्हतं. आधी कधीच अस झाल नव्हतं.  मुलासामोर मात्र ते दोघे नॉर्मल च होते. या वेळी दोघांनीही ठरवलेलं मी नाही सॉरी बोलणार, नेहमी मीच का सॉरी बोलु ? त्यांच्या २ वर्षाच्या बाळाला मात्र काहीच कळत नव्हत.  बाळ निरागस पणे खेळण्यात बिझी होतं. बाबा कामावरून आला. ती पाण्याने भरलेला ग्लास आणून समोर ठेवते आणि किचन मध्ये निघून जाते. तो थोडंसं पाणी पितो आणि ग्लास टेबलवर ठेवून फ्रेश व्हायला निघून जातो. ५ मिनिटांनी जोरात आवाज होतो म्हणून दोघेही बाहेर धावत येतात आणि पाहतात तर, त्यांचा मुलगा तो ग्लास उचलून आत ठेवायला जात असताना पाय अडकुन पडतो आणि त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो. मुलगा घाबरून उठतो आणि कान पकडून ..." सॉली " बोलत आईला जाऊन मिठी मारतो आणि आई - बाबा...

जीवन खुप सुंदर आहे

आज अचानक बातमी आली आणि धक्काच बसला. सुशांत सिंग राजपूत ने आपल्या मुंबईच्या राहत्या घरात आत्महत्या केली. तसे या वर्षी बरेच धक्के आपण सहन केलेत. कितीतरी चांगल्या कलाकारांना गमावलं आपण यावर्षी. त्यातले काहीजण वृध्द होते, काही आजारी आणि काही मानसिकरीत्या आजारी. डिप्रेशन सध्या सगळ्यात मोठा आजार झालंय. होय, कोरोणा पेक्षा ही भयानक आजार. इतर आजारांमध्ये तुम्हाला आजाराची लक्षणं दिसतात, इतर लोक तुमची काळजी घेतात पण डिप्रेशन हा असा आजार आहे की त्यात बऱ्याचवेळा तुम्हालाच कळतं ही नाही, ना तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना. खरतर आपल्याकडे या गोष्टीला तेवढस महत्वचं दिलं जात नाही. बरेच जण तर बोलायलाच घाबरतात कारण आपण जर बोललो तर लोक हसतील, नाहीतर आपल्याला थोडंसं सकारात्मक काहीतरी बोलुन ज्ञान द्यायचं काम करतील, यापुढे काही होणार नाही. डिप्रेशन हा सध्याच्या तरुण पिढीत वाढणारा सगळ्यात वाईट आजार झालाय. सोशल मीडियाच्या जगात १००-२०० मित्र असून सुद्धा ज्याच्याशी आपण आपल्या मनातलं शेअर करू शकतो, जो आपल्याला समजून घेऊ शकतो असा एकही मित्र आपल्या भेटू नये? का आपण उघडपणे आपल्या भावना कोणासमोर व्यक्त ...

ठेच

सं ध्याकाळ ची वेळ, आई - बाबा बसून गप्पा मारत आहेत. दोघांच्या हातात मोबाईल. बाबा : अगं, तुला सांगायला विसरलो. त्या पवारांच्या मुलीच लग्न ठरलं. पुढच्या विकेण्डला आपल्याला जाव लागेल लग्नाला. आई : अरे वाह, चांगलं झालं. बाबा : काय चांगल झालं? माझ्या मते तो फारच गडबड करत आहे. आई : कसली गडबड? अरे आपल्या मानसी बरोबर ची आहे ती. दोघींनी इंजिनिअरींग केल सोबत आणि आता 3 वर्ष झाली जॉब करतेय. चांगली सेटल आहे आणि जर मुलगा पण वेल सेटल आणि मनासारखा असेल तर ...चांगलच. ( हातातला मोबाईल बाजूला ठेवत) बरं, मी काय म्हणते... बाबा : नको बोलुस ( मोबाईल कडे बघत) आई : अस काय रे करतोस, ऐकून तरी घे... बाबा : मला माहिती आहे की तु आता काय बोलणार आहेस. यावेळेस कोणी स्थळ सुचवलय ? आई : अरे, त्या जाधव आहेत ना त्यांचा भाचा आहे. वेल सेटल आहे आणि स्वभावाने पण फार चांगला आहे. बाबा : तुला त्याचा स्वभाव कसा माहिती ? आई : अरे, त्या जाधव बाई सांगत होत्या. त्या मला त्याचा फोटो वॉट्सप करणार आहेत. बाबा : अगं, हो हो... कीती घाई. आई: घाई नाही रे, त्यांनी मला सुचवलं म्हणून मी तुला सांगितलं. आणि आता पासुन सुरुवात करू  ते...

भाग्यरेषा.... भाग ३

शो भाला मात्र स्वतःचीच लाज वाटत होती. नक्की काय कमी पडली तिच्या प्रेमात की सुनिलने तिच्याशी असं वागावं. इकडे सुनिल मात्र दोन दिवसात घरी परतला. परशुरामचे डोळे शोभाला शोधत होते, पण सुनिल एकटाच होता. परशुराम उठून सुनिलला शोभाबद्दल विचारू लागला, “ सुनिल, शोभा कुठे आहे ?” सुनिल, “ती मुंबईत हरवली” परशुराम, “काय ? अशी- कशी हरवली? तु कुठे होतास ?” सुनिल , “मी तिच्या सोबतच होतो. तीच कुठे गेली काय माहीत, मला वाटतंय ती तिच्या यारसोबत पळून गेली.” परशुराम, “ तोंड सांभाळून बोल. शोभा तशी नाही.” सुनिल, “ मग कशी आहे ?, तुम्ही नका सांगू मला, वेडं बनवलं तिने आपल्या सगळ्यांना, सगळे दागिने आणि पैसे घेऊन पळून गेली ती.” सुनिल जोरजोरात रडून परशुरामच्या गळ्यात पडतो. सुनिल, “अहो बाबा तुम्ही खूप साधे आहेत त्याचाच फायदा उचलला तिने. बरं झाली ती अवदसा गेली.” परशुराम, “सुनिल, तोंड बंद कर तुझं” सुनिल, “ तुम्हाला स्वतःच्या मुलापेक्षा तिची जास्त काळजी आहे. मला एकदा तरी विचारलत मी कसा आहे?” परशुराम, “ मला विश्वास नाही बसते. शोभा असं नाही करू शकत." सुनिल, “असच झालय बाबा, विश्वास ठेवा माझ्यावर” परशुराम डोक्याला हात ल...

भाग्यरेषा... भाग २

शा मरावने सगळा प्लॅन सुनिल आणि कमळा ला सांगितला ते दोघेही खुश झाले. तिघांनी एकमेकांकडे हसत पाहिलं आणि सुनिल तिथून निघुन गेला. सुनिल घरी आल्यावर अनिल आणि परशुरामशी गप्पा मारत बसला. सगळे एकत्र जेवले. सगळं काही चांगलं होऊ लागलं होतं पण परशुरामच्या मनात एक खंत होती, सुनिल अजूनही शोभाशी बायकोसारख वागत नव्हता. शोभा मात्र सुनिलवर फार प्रेम करत होती. त्या घरासाठी फार काम करायची. दुसऱ्या दिवशी सुनिल परशुरामकडे आला आणि त्याने इच्छा प्रकट केली. सुनिल : मला माहितीये बाबा, तुम्हाला सगळ्यांना मी फार त्रास दिलाय, त्याहीपेक्षा शोभाला. तिला कधीच कुठलंच सुख दिल नाही मी. पण आता मला माझी चूक कळलीये. बाबा, माझी इच्छा आहे की मी तिला घेऊन मुंबईला फिरून यावं. परशुराम : (हसत) अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. तुला हवं तिथे जा तिला घेऊन तिलाही बरं वाटेल, बिचारी दिवसभर राबते घरासाठी. तुमच्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा हीच इच्छा राहिलीये. ते दोघेही बाहेरच्या पडवीत बसले होते आणि शोभा भिंतीपलीकडून सगळं ऐकत होती. ते ऐकून तिच्या आनंदाला सिमा उरली नाही, तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि हसत-हसत ती देव्हाऱ्याजवळ गेली आणि देवा...

भाग्यरेषा ...भाग१

म हाराष्ट्रात थेरगाव म्हणून एक छोटंसं गाव होत. गावात ५०-६० घर असावीत. त्या गावात परशुराम पाटील नावाचे गृहस्थ होते, जे या गावचे सरपंच होते. ४५ च्या आसपास वय, किडकिडीत देहयष्टी, डोक्यावर बांधलेला फेटा, अंगात पांढरा सदरा आणि धोतर. गावातल्या काही अडी-अडचणी, समस्या समजुन घेऊन त्यावर योग्य आणि लोकहीतकारक सल्ला देऊन ते नेहमीच लोकांची मदत करायचे. कोणाची पैस्यांची गरज लक्षात घेऊन त्याची ही नड ते भागवत. एकंदर प्रेमळ, माणुसकीबाज असा हा माणुस. गावातले लोक त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा फार आदर करीत. तो म्हणेल तेच योग्य असा लोकांचा त्यावर पुर्ण विश्वास होता. परशुराम धन- दौलत, नोकर-चाकर सगळं असुनही त्यांना कौटुंबिक समाधान मात्र हवे तसे नव्हते. परशुरामचे आई-वडील गेले आणि घराची- शेतीची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली. परशुरामचे लग्न झाले. त्यांची बायको सुमित्रा फार सुंदर आणि स्वभावाने चांगली होती. त्यांना एकूण दोन मुले झाली. त्यातील पहिला अनिल. त्याच्या जन्माने गावकरी ही फार खुश झाले. जसा- जसा अनिल मोठा झाला तसं त्याचं अपंगत्व सगळ्यांना कळालं, बरेच औषधोपचार केले, अंगारे-धुपारे केले पण काह...